मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान राबविण्यात येत आहे.
सदर अभियानाचे सात मुख्य घटक आहेत –
- सुशासनयुक्त पंचायत,
- सक्षम पंचायत,
- जलसमृध्द, स्वच्छ व हरित गाव,
- मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण,
- गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण,
- उपजीविका विकास व सामाजिक न्याय, तसेच
- लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. हे अभियान दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबवले जाईल. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार दिले जातील.
अधिक तपशिलासाठी पुढील शासन निर्णय वाचा –